top of page

हे बंध रेशमाचे..!

  • Writer: Harshali
    Harshali
  • Jun 7, 2020
  • 2 min read

नमस्कार,

कसे आहेत सगळे? खरं सांगायचं तर जसं quarantine चालू झालय तसं आपण सगळेच फ्रेंड्स सोबतचे video कॉल्स चे स्क्रीनशॉट share करत होतो. खूप दिवसांनी सगळ्यांसोबत निवांत गप्पा मारता येत होत्या. हसणं ,रुसणं,एकमेकांना चिडवणं हे सगळंच परत चालू झालं होतं. आणि अशातच मस्त जुन्या आठवणी उजळून येत होत्या. त्यामुळे एके संध्याकाळी घराच्या बाल्कनीमध्ये चहा घेत बसलेली असताना, सहज जुने फोटो चाळत होते, त्यात स्वतःला बघून फार हसू येत होतं. पण आठवणी मात्र आजही तेवढ्याच सुंदर आणि ताज्या होत्या.

काही फोटोस तर मी तेव्हा का काढले हे मला अजूनही न उमगलेलं कोडं आहे. तेव्हाची माझी फोटोग्राफी आणि आत्ताची फोटोग्राफी यात अजूनही काहीच फरक नाही हे पाहून उदास व्हायला होतं मला!असो,पण हे सगळं चाळत असताना एक विचार चमकून गेला कि काही लोकं म्हणा किंवा वस्तू म्हणा आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत आपल्या इतक्या जवळच्या असतात आणि मग अचानक काही वर्षांनी त्या इतक्या विस्मरणात जातात कि काही फोटोस,जुने messages यांचा आधार घेऊन याच आठवणी आपलं बोट धरून त्यांच्या जगात घेऊन जातात.इतक्या दिवस विस्मरणात असणाऱ्या आठवणींचा मग चित्रपटच सुरु होतो आणि नकळत चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसवं यांचा विचित्र संगम सुरु होतो.

माणसांचं असंच असावं बहुदा.काही व्यक्ती एकाच भेटीत आपल्याला जवळच्या वाटायला लागतात. त्यांची आणि आपली wavelenght लगेच match होते.तर काही व्यक्ती आपल्याला अजिबात आवडत नाहीत.यांच्या सोबत आपलं कधीच जमणार नाही हे आपलं ठाम मत होत.अर्थात कालांतराने परिस्थिती उलट हि होते. जिचं आपलं जमणार नाही असं वाटणारी व्यक्ती आपली जवळची होते आणि पहिल्या भेटीत आपल्यासारखीच वाटणारी व्यक्ती अगदीच भिन्न वाटायला लागते. हो ना? हे रेशीम बंध जुळायला त्या व्यक्तीबरोबर खूपच गप्पागोष्टी, भेटीगाठी व्हायला हव्यात किंवा आपण अगदी एकाच वयाचं असावं असं काही नाही. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर रोज ऑफिसला जाताना ट्रेन वा बसने जाताना काही चेहरे रोज भेटणारे असतात. त्यातल्या किती जणांसोबत आपण बोलतो तर जवळजवळ कुणासोबतच नाही. पण तरीही एखाद्या सकाळी रोज दिसणारा चेहरा नाही दिसला तर १ सेकंद का होईना पण आपण चमकतोच आणि त्या व्यक्तीचा absense आपल्याला जाणवतो.काही वेळात आपण ते विसरतो किंवा त्यानंतर आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही कारण व्यक्ती अनोळखी असते पण हेच जवळच्या व्यक्तींसोबतही आपण करतो.कधी कधी 'मला काहीच फरक पडत नाही' हा अविर्भाव घेऊन आपण त्यांच्याशी वागतो आणि त्यांना दूर करतो. . आठवून बघा बरं, शाळेतल्या आपल्या मैत्रिणींच्या ग्रुप मधल्या किती जणींशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत? तेव्हा अगदी घट्ट मैत्री असणाऱ्या किती मित्र मैत्रिणींशी अजूनही आपण बोलतो? किंवा कॉलेजचा एखादा खूप जवळचा मित्र, त्याचा आणि आपला सवांद नक्की कोणत्या कारणाने हरवलाय? आता इथे स्वतःला defend करण्यासाठी आपण excuse देऊच कि त्याने / तिने कॉन्टॅक्ट केला नाही कधी, मीच का कॉल करायचा, ती/तो आधी भांडला आणि etc etc. न संपणारी list. पण अगदी खरं खरं सांगा, मनाच्या हळुवार कोपऱ्यात अगदी आजही कॉलेजला एकत्र असताना केलेली मजा अजून हि आठवते ना? सगळं काही असताना अचानक कधीकधी आपल्या लांबच्या किंवा अगदी जवळच्या हि माणसांची कमी जाणवतेच ना ? या सगळ्यांशी अगदी भरभरून बोलावसं वाटत ना? मग हे excuses का? नक्कीच, काही reasons खरंच genuine असतात/आहेत. पण या सगळ्यातून मार्ग हि आपणच काढायला हवा ना?

चला तर मग आपण सगळेच मिळून आज स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या जवळच्या पण आता दुरावलेल्या व्यक्तीशी परत एकदा मनमोकळेपणाने बोलूया. काही गैरसमज असतील तर नक्कीच दूर करूयात. त्यांची चूक असो वा आपली,आता ती मान्य करूयात. कारण चुका करण्यापेक्षा मान्य करायला जास्त धाडस लागतं. हे धाडस आज आपण करूयात. मग आपण सगळेच आज हरवलेल्या संवादाला शोधूयात आणि हे बंध रेशमाचे जपुयात !

 
 
 

3 Comments


shravanikale90
Jun 07, 2020

Nice❤️❤️❤️

Like

shravanikale90
Jun 07, 2020

It seems like our story somewhere... But happened long time ago😅😬

Like

anitasingh1803
Jun 07, 2020

Nice 👍.Really good one to read during quarentine

Like

Subscribe Form

©2020 by मनातलं... Proudly created with wix.com

bottom of page